जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका
जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका १८९२ पासून इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली. र्लॉड कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा उदय झाला. जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे. लाल, बाल, पाल यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल विचाराचा प्रसार केला. जहालजवादाच्या उदयाची कारणे आणि कार्यक्रम १) सरकारचे अन्यायकारक धोरण इंग्रजांचा आर्थिक साम्राज्यवादातून राजकीय साम्राज्याचा उदय झाला भारतातून व्यापार, कर, पगार, माध्यामातून प्रचंड संपज्ञ्ल्त्;ाी मायदेशी पाठवली. २) शेतकर्यांची पिळवणूक भारतातील जनता शेतीवर अवलंबून होती. नैसर्गिक संकटे, टोळधाडी यामूळे उत्पन्न मिळत नसे तरीपण सरकारला कर द्यावा लागत असे सावकार व सरकारकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याने उपाशीपोटी जीवन जगावे लागे. ३) नैसर्गिक संकटसंदर्भात जुलमी धोरण १८९६-९७ व १९०० या काळात दुष्काळ पडून दोन कोटी लोकांना तडाख बसला तरीही सरकारने उपाययोजना केली नाही. महाराष्ट्र्रा