भारतातील शिक्षणाचा विकास

भारतातील शिक्षणाचा विकास

पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख

कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेले योगदान महत्त्वाचे ठरते .यात विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श यांनी संस्कृत , बंगाली , हिंदी , मराठी या भारतीय भाषांचा अभ्यास केला .
1. वॉर्ड- ' बायबल ' चा बंगाली भाषेत अनुवाद .
2. मार्शमन - भारताचा इतिहास , भुगोल , खगोलशास्रावर पुस्तके लिहिली .
3. फेलिक्स कँरे - बंगाली भाषेत विश्वकोष
4. कोलकाता ढाका चितगाव येथे इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या .त्यात ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासावर भर होता .
5. १८१८- श्रीरामपूरयेथे बाप्टिस्ट मिशन कॉलेज सुरू केले .

इंग्रज अधिकाऱ्यांद्वारे स्थापन केलेली विद्यालये / महाविद्यालये

1. १७८१- जनरल वॉरन हेस्टींग - कलकत्ता मदरसा
2. १७९१- इंग्रज रेसिडंट जोनाथन - डंकन - संस्कृत महाविद्यालय बनारस.
3. १७८४ - बंगाल एशियटीक सोसायटी - कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी वॉरन हेस्टींगच्या मदतीने .
4. इंग्लंड मधीलचार्लस ग्रँड व विल्यम व विल्यम विल्बरफोर्स याइन्व्हेन्जेलिकल संप्रदायाच्या अनुयायांनी भारतात कंपनी सरकारद्वारे मिशनरीद्वारे मिशनरी कार्यास परवानगी देण्याची मागणी केली .
5. १८१३ चा कायदा - भारतात पाश्चात्त्य ज्ञानाचा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनरी वर्गाला परवानगी देण्याची तरतुद १८१३ च्या सनदी कायद्यात दिली .

शिक्षण विषयक धोरण

१.  १८२३ - ' कोलकाता स्कूल सोसायटी ' व ' कोलकाता स्कूल बुक सोसायटी ' यांना लॉर्ड हेस्टींग्जने अनुदान दिले . कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ची स्थापना .
२.  १८२४ - संस्कृत महाविद्यालय कोलकाता येथे स्थापना . या काळात ' ओरिएंटँलिस्ट ' गटातील होरेस विल्सन , विल्यम जोन्स , प्रिन्सेप यांनी भारतातील प्रचलित शिक्षण व्यवस्थेलाप्रोत्साहन दिले तर ' अँग्लिसिस्ट' गटातील बिशप हेबर , अलेक्झांडर डफ , चार्लस ट्रिव्हेलियन सारखे इंग्रज अधिकारी व राजा राम मोहन रॉय यासारख्याभारतीय समाज सुधारकांनी पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला .
३.  १८३४ - लॉर्ड मेकॉलेची गव्हर्नर - जनरलच्या कौन्सिलातील विधी सदस्य नियुक्ती . खालील प्रस्ताव गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलपुढे मांडले .त्यानेइंग्रजी शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन दिले जावे. शिक्षणासाठी मंजुर झालेली रक्कम पौर्वात्य शिक्षणावर खर्च केली जाऊ नये. ७ मार्च १८३५ मेकॉलेने मांडलेल्या प्रस्तावास मंजुरी

४.  १८३९ - आँक्लंडने मेकॉलेच्या प्रस्तावात बदल करुन रकमेचाकाही भाग पौर्वात्य शिक्षणावर खर्च करण्याचा तसेच दर महिन्याला एशिॲटीकसोसायटीला रुपये ५०० देण्याचा निर्णय घेतला .
५.  १८४२ - ' कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ' ची जागा "कौन्सिल आँफ एज्युकेशन " ने घेतली .
६.   १८४३ - १८५५ बंगाल मधील सरकारी नियंत्रणाखालील शाळांची संख्या २८ वरुन १५१ पर्यंत गेली .
७.   १८५४ - प्राथमिक व उच्च शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन दिले . नियामक मंडळाचा अध्यक्ष सर चार्लस वुड याने १८५४ मध्ये शिक्षण विषयकखलिता तयार केला .

१८५४ चा वुडचा खलिता - वैशिष्ट्ये

1. शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण नको .
2. स्री शिक्षणाला सरकारने विशेष उत्तेजन द्यावे .
3. शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी वदर्जा सुधारण्यासाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर करावा .
4. शिक्षणाचे स्वतंत्र खाते सरकारने स्थापन करावेत .
5. इलाख्याच्या मुख्य शहरात विद्यापीठे स्थापन करावी .

जानेवारी १८५७ - कोलकाता येथे विद्यापीठ स्थापन .
जुलै१८५७ - मुंबई येथे विद्यापीठ स्थापन .
सप्टेंबर १८५७ - मद्रास येथे विद्यापीठ स्थापन .
डलहौसीने १८५७ पर्यंत स्थापन केलेली महाविद्यालये
- वैद्यकीय महाविद्यालये - मुंबई , मद्रास ,लाहोर

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती